नितीन गडकरी यांच्या मुंबई-गोवा महामार्ग कामाला लागलेला काळीमा हेच भारतीय जनता पक्षाचे अपयश; अरविंद सावंत

मुंबई : नितीन गडकरी हे कौतुकास्पद व्यक्तिमत्व असले तरी दुर्देवी म्हणजे नितीन गडकरी यांच्या सर्व उपक्रमांमध्ये आणि निर्णयांमध्ये मुंबई-गोवा महामार्ग या त्यांच्या कामाला काळीमा लागला आहे. हेच भारतीय जनता पक्षाचे अपयश आहे, हे अपयश झाकण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेपूर्वी शिंदे गटातील आमदार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. यावर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत म्हणाले, हे सर्व हास्यास्पद आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुढे नेत असलेली शिवसेना ही खरी शिवसेना आहे. त्यामुळे यांचा काही संबंध नाही, हे सर्व स्वतःचे अपयश आणि चुका लपवण्यासाठी हे प्रकार सुरू असल्याची टीकाही त्यांनी शिंदे गटावर केली आहे.