तिसंगीत फक्त जोर्तिलिंग विकास आघाडीचाच बोलबाला

साळवण : अवघ्या दोन दिवसावर येउन ठेपलेल्या तिसंगी ग्रामपंचायत निवडणूकीत प्रचाराचा वेग आला आहे.जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील सर यांच्या नेतृत्वाखालील जोर्तिलींग ग्रामविकास आघाडीने प्रचारात ही आघाडी घेतली आहे.

सध्या गगनबावडा तालुक्यासह तिसंगीत केवळ याच पँनेलचाच बोलबाला आहे.प्रचार रँली .वयक्तिक गाठी भेठीवर जोर दिला आहे.

कार्यकर्ते तर हे संपूर्ण पँनेल विजयी करण्यासाठी जिद्दीने कार्यरत आहेत.सरपंचाचे उमेदवार संजय गणू पाटील तसेच सचिन पोतदार, भारती पाटील, शालाबाई वाघरे,गिता पोतदार, अश्विनी खाडे,यशवंत कांबळे, विकास गायकवाड, या उमेदवारांना मतदाराकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे पँनेलच पूर्णपणे विजयी होणार अशी चर्चा सुरू आहे. सध्या तरी सर्वत्र केवळ या पँनेलचाच बोलबाला आहे.