श्रद्धा वालकर प्रकरणी वडिलांचा धक्कादायक आरोप ; आफताबचे कुटुंबीय देखील खुनात सहभागी असल्याचा दावा…

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात श्रद्धाच्या वडिलांनी पुन्हा एक धक्कादायक दावा केला आहे. आफताबचे कुटुंबीय सुद्धा आपल्या मुलीच्या (श्रद्धा वालकर) खूनात सहभागी होते, असा धक्कादाय आरोप विकास वालकर यांनी केला आहे.

आफताबला श्रद्धासंदर्भात समज द्यावी हे सांगण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. आम्ही आफताबच्य घरी गेलेलो तेव्हा त्यांनी आमचं साधं ऐकूनही घेतलं नाही. पण आता मला वाटतंय की आफताबचं संपूर्ण कुटुंबच श्रद्धाच्या हत्येमध्ये सहभागी होतं. सध्या त्यांचं कुटूंब फरार आहे. पोलिसांनी त्याच्या कुटूंबियांचीही चौकशी केली पाहिजे,” असा दावा विकास वालकर यांनी केला आहे. पण दिल्ली पोलीस आफताबच्या कुटुंबियांची चौकशी करत नसल्याची नाराजीही विकास वालकर यांनी व्यक्त केली आहे.श्रद्धाला झालेल्या मारहाणीसंदर्भात आता शेजाऱ्यांनी सांगितले की, तो श्रद्धाला इतकी मारहाण कारायचा की त्याच्या मारहाणीपासून वाचण्यासाठी ती इमारतीखाली पळून यायची,” असंही विकास वालकर यांनी सांगितलं. दरम्यान, आफताबच्या संपर्कात आल्यानंतर श्रद्धाचं वागणं, बोलण्यात फारच बदलला होता. तिच्या वागणं बदललं होत. तिच्या नात्यासंदर्भात तिने एखाद्या समोपचारकाची मदत घेण्याचा सल्लाही दिला होता,” असं विकास वालकर म्हणाले. तर, “वसईमध्ये राहत असताना एकदा श्रद्धाने मला मेसेज केला होता की येऊन मला घेऊन जा नाहीतर आफताब मला मारुन टाकेल,” असं श्रद्धाच्या वडिलांना ती संपर्काच्या बाहेर असल्याचं सर्वात आधी सांगणाऱ्या श्रद्धाच्या मित्र लक्ष्मण याने सांगितलं होतं.

दरम्यान, आफताबच्या कुटुंबियांनाही त्यांच्या मुलाने केलेल्या कृत्याची कल्पना होती का, यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहे. याचं मुख्य कारण म्हणजे एकीकडे आफताबची या प्रकरणामध्ये चौकशी सुरु असतानाच आफताबच्या कुटुंबियांनी तातडीने राहत्या सोसायटीमधील घर सोडून दुसरीकडे स्थलांतर केलं होतं. आफताबल अटक करण्च्याच्या १५ दिवस आधी तो मुंबई असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना भेटून गेला होता. यावेळी त्यांनी कुटूंबियांना त्याने शिफ्टींगसाठी मदत केली होती.